निवेदन

सरकारला देण्यात येणारे निवेदन

सरकारला प्रश्न विचारणं म्हणजे विरोध नव्हे, तर जबाबदारीचं नागरिकत्व आहे!
“प्रश्न विचारणं म्हणजे विरोध नव्हे – जबाबदारीचं नागरिकत्व आहे!”

लोकहो आपण कुणाला घाबरत आहात? कोकणच्या विकासासाठी प्रश्न विचारणं म्हणजे देशद्रोह नाही… हीच तर खरी लोकशाही आहे!

आज जर तुम्ही सरकारला प्रश्न केला… की,
“रस्ता अजून पूर्ण का झाला नाही?”
“महामार्गाच्या निधीचं काय?”
“काम करत नसलेल्या ठेकेदारांवर कारवाई अद्याप का नाही?”

…तर लगेच एक लेबल मिळतं – “विरोधक आहात का?”

विरोधक नव्हे – आपण जागरूक नागरिक आहोत!

आमचं गाव आहे,

आमचे रस्ते आहेत,

आमचा जीव जातोय,
मग प्रश्न विचारायचा हक्कही आमचाच आहे!

“लोकशाहीत मतदानानंतर दुसरं मोठं कर्तव्य असेल, तर ते म्हणजे – सरकारला प्रश्न विचारणं!”
(जाब विचारणे)